लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी कतरिना आणि विकी दोघांची एंगेजमेंट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, दोघांनीही हे या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.
मीडिया रिपोर्ट्ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचा रोका झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. ही बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली याबाबत दोघे ही विचार करत होते. एवढंच नाही तर ही बातमी लिक होण्यात कोणाची टीम जबाबदार आहे यावरून दोघांमध्ये वाद झाला. कारण दोघां प्रेक्षकांचे लक्ष हे त्यांच्या लग्नाच्या बातमीकडे नाही तर त्यांच्या प्रोजेक्ट्सकडे वळवायचे होते.
रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.




Comments (0)
Facebook Comments (0)