संप सुरु असला तरी…
राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, आज एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन एसटी महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नी यांनी केलं आहे.
शेखर चन्ने म्हणाले, “संप सुरु असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे मी आवाहन करतो. त्यांना मदत करत करण्यात येईल. मॅकेनिकल स्टाफ कामावर येण्यास सुरवात झाली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची संपात सहभागी होण्याची इच्छा नाही ते कर्मचारी कामावर यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांना संरक्षण देखील प्रशासन देईल. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी संप न वाढवता तात्काळ कामावर रुजू व्हावे. कर्मचाऱ्यांची मागणी उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. न्यायालयाने यासंदर्भात समिती देखील स्थापन केली आहे. त्यामुळे आता संप करण्यात काही अर्थ नाही.”
“सध्या ३६ बसेस पोलीस संरक्षण देऊन सुरु केल्या आहेत. संपामुळे सव्वाशे कोटी रुपयाचा लॉस महामंडळाचा झाला आहे. तसेच जे कर्मचारी निलंबित झाले नाहीत ते कामावर येऊ शकतात. आमचा नाहीतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन कर्मचाऱ्यांनी करावं”, असे आवाहन शेखर चन्ने यांनी केलं आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)